Share

काय सांगता, दोन दिवासांत अधिकाऱ्यांनी केले गडकरींनी सांगितलेले ‘हे’ काम   

Published On: 

🕒 1 min read

अमरावती: किसान रेल्वे अमरावतीवरून तातडीने सुरू करणे व संत्र्यासह केळी, भाजीपाला, रानभाज्या, सिताफळ, दूध अन्य शेतमालाची पश्चिम विदर्भाच्या विविध केंद्रावरून बुकिंगच्या व्यवस्थेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेश कुमार, डीसीएम कृष्णा पाटील व अन्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. रेल्वे विभागाने या प्रस्तावाला मान्यता दर्शवली आहे.

शेतकऱ्यांचा माल देशाच्या विविध बाजारपेठेत किसान रेल्वेच्या माध्यमातून पोहचविण्यासाठी सदर मालाची बुकिंग व रेल्वेच्या वेळापत्रकाची माहिती मिळण्यासाठी संकेतस्थळ विकसित करण्यात येईल. या वेबसाईटवरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे बुकिंग करण्याची सोय असेल व या सर्वबाबींचे नियोजन ताबडतोब करण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना सांगितले.

तसेच संत्र्याचे पीक हाताशी आले असल्याने विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा माल बांग्लादेशमध्ये कमी वेळ आणि कमी खर्चात निर्यात करण्यासाठी विशेष किसान रेल अमरावती जिल्ह्यातील व विदर्भातील विविध केंद्रावरून सुरू करण्याचेही नियोजन होणार आहे.

अमरावतीवरून किसान रेल सुरू करण्याची पश्चिम विदर्भ विकास परिषदेची मागणी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केवळ ऐकलीच नाही तर या मागणीला नियोजनाची जोड देऊन निर्णयापर्यंत पोहचविले त्याबद्दल पश्चिम विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, महिला, बेरोजगार, व्यापारी, उद्योजक व नागरिकांच्यावतीने परिषदेचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, संयोजक नितीन भुतडा, निमंत्रक गजानन कोल्हे यांनी नितीनजींचे आभार मानले आहे.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!