उत्तर प्रदेश : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजन अभावी मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र युपी सरकारने (UP Government)या विरोधात दावा केला आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी युपीत एकही मृत्यू झालेला नाही. उत्तर प्रदेशमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी योगी सरकारने यासंदर्भात माहिती दिली आहे.
विधान परिषदेत काँग्रेसचे सदस्य दीपक सिंह यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावीपूर्ण उत्तर प्रदेश राज्यात किती मृत्यू झाले, याविषयीचा प्रश्न करत राज्य सरकारकडे माहिती मागितली होती. या प्रश्नाला उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह (UP Health Minister Jay Pratap Singh)यांनी लेखी उत्तर दिले आहे.
दरम्यान, देशात एप्रिल ते जून या कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रचंड कहर पाहायला मिळाला. या कालावधीत हजारो कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचे दिसले. तर कधी बेडची कमतरता, लसींचा अपुरा पुरवठा, रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा यासर्व प्रश्नांना देशाला सामोरे जावे लागले. यावरूनच विरोधी पक्षाने मोदी सरकारला चांगलेच धरले. मात्र युपी सरकारच्या या दाव्यामुळे मात्र विरोधी पक्षाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र सरकारची स्वार्थाची पोळी..विद्यापीठाच्या स्वायत्ततेची केली होळी’, औरंगाबादेत अभाविपचे जोरदार आंदोलन!
- आता आतुरता किराणा दुकानात मामुच्या परवानगीने हर्बल तंबाखू मिळण्याची- सदाभाऊ खोत
- बाथरूममध्येही लोकांना भेटणारे हे पहिलेच मुख्यमंत्री; केजरीवालांची टीका
- ‘आम्ही भरवलेल्या शर्यतीला मिळालेल्या प्रतिसादानंतर सरकारचे डोळे उघडले’
- बोगराची लढाई ही १९७१ च्या युद्धाचा सर्वाधिक रक्तरंजित अध्याय- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

