🕒 1 min read
जालना : राज्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हळूहळू वाढत असला तरी चिंता किंवा काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. पण पॉझिटिव्हिटी दर वाढतोय त्याअर्थी टेस्टिंग रेटही वाढवला पाहिजे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री यांना टेस्टिंग वाढवण्याबाबत सुचवले असून मुख्यमंत्र्यांनीही हे मान्य केले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही यात लक्ष द्यावे, अशा सूचना केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, २४ तासांत राज्याची स्वॅब टेस्टिंगची क्षमता २ लाखांहून अधिक आहे, ती सध्या सव्वा-दीड लाख पाहायला मिळत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने टेस्टिंग केल्याच पाहिजेत. जालना जिल्ह्याचा विचार करता आपण दर आठवड्याला बैठक घेतो. तसेच प्रयोगशाळेची दोन-अडीच हजार टेस्टिंगची जी क्षमता आहे ती पूर्णपणे वापरली गेली पाहिजे, अशा सूचना दिल्याचे ते म्हणाले.
मराठवाड्यामध्ये शिक्षण, आरोग्य सुविधा, तसेच दरडोई उत्पन्न वाढविण्याबरोबरच उद्योगांच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार निर्मिती होणेही गरजेचे आहे. आपल्या मराठवाडा विभागाबरोबरच जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास अधिक जलदगतीने होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहनही टोपे यांनी यावेळी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- काल मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान अन् आज जयंत पाटील आणि फडणवीस एकाच गाडीत
- राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, काहीही चमत्कार होऊ शकतो – विखे
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरु आहेत उपचार
- पंजाब कॉंग्रेसमध्ये भूकंप; नेतृत्वाच्या बदलाच्या चर्चांना आले उधाण
- ‘मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ विधान बीकेसीतील पूल दुर्घटनेवरून लक्ष हटवण्यासाठी दिले?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
