Share

कोरोनाचा उद्रेक! औरंगाबाद जिल्ह्यात रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम बंद

Published On: 

औरंगाबाद : अंशत लॉकडाऊन करूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम, नाश्ता सेंटर, धाबे, फूड पार्क, फन पार्क, रिसॉर्टमधील डायनिंग सुविधा (आसनावर बसून खाणे) येत्या १७ मार्चपासून पूर्णतः बंद करण्यात येत आहे. याबाबतची माहिती आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात ११ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. शनिवार, रविवार पूर्णतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. दरम्यानच्या काळात रेस्टॉरंट, हॉटेल, परमिट रूम, नाश्ता सेंटर, धाबे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले.

याठिकाणी जेवताना मास्क काढल्याने प्रादुर्भावाचा धोका अधिक असतो. तसेच अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचही पालन होत नाहीये. त्यामुळे या ठिकाणाहून केवळ पार्सल सेवा अथवा घरपोच सेवा सुरू राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. जर एखाद्या हॉटेल मालकाने नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!