Share

‘कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाही; आंदोलनं कसली करताय ?’, मुख्यमंत्री भडकले

Published On: 

मुंबई : राज्यासह देशातील दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने अधिक सूट दिली आहे. तर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा राज्यावर कायम आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये राज्य सरकारविरोधात विरोधकांचे आंदोलने वाढली आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाचा धोका हा कायम असून हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाही, त्यामुळे आंदोलने कसली करताय ?, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना खडसावलं आहे.

प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मीरा रोड येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, युवासेना सचिव नगरसेवक पूर्वेश सरनाईक आदी उपस्थित होते. या प्रकल्पाचे लोकार्पण करताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लक्ष्य केल्याचं दिसून आलं.

‘लाट ओसरण्यासाठी किती कष्ट करावे लागले याची कोणाला जाण नाही, भान नाही. पण लाट ओसरल्यानंतर अमूक करा नाही तर आम्ही आंदोलन करू, तमूक करा नाही तर आंदोलन करू, असे इशारे दिले जात आहेत. अरे आंदोलन कसली करताय? कोरोना हा काय सरकार मान्य कार्यक्रम नाही. हा काही मोफत कोरोना वाटपाचा कार्यक्रम नाहीये. आंदोलन करायचे असेल तर जास्तीत जास्त ऑक्सिजन प्लांट लावण्याचं आंदोलन करा ना,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फटकारलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!