Share

कोरोनामुळे देशाला दाेन लाख कोटींचा फटका; RBI चा अंदाज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. नुकतेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आर्थिक फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या एप्रिल-मे महिन्यात देशाच्या उत्पादकतेवर माेठा परिणाम झाला आहे. याचा तब्बल दाेन लाख काेटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने घेतलेल्या आढाव्यातून हे स्पष्ट झाले आहे.

दुसऱ्या लाटेमुळे सर्वच राज्यांमध्ये लाॅकडाऊन किंवा कठाेर निर्बंध लावण्यात आले हाेते. अनेक सोई बंद करण्यात आल्या. त्यामुळे देशांतर्गत मागणी घटली. त्याचा घरेलू उत्पादनावर माेठा परिणाम झाला. हे नुकसान सुमारे २ लाख काेटी रुपयांपर्यंत असल्याचा आरबीआयने अंदाज व्यक्त केला आहे.

बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी ‘स्टेट ऑफ इकाॅनाॅमी’ संदर्भात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, दुसऱ्या लाटेने लहान शहरे आणि ग्रामीण भागालाही विळखा घातला हाेता. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील मागणीवर विपरित परिणाम झाल्याचा उल्लेख या लेखात करण्यात आला आहे. केवळ लसीकरणाद्वारेच विषाणू नष्ट हाेणार नाही. आपल्याला विषाणूसाेबत जगणे शिकावे लागेल. याशिवाय संशाेधन आणि लाॅजिस्टीक्स या क्षेत्रात गुंतवणूकीमध्ये वाढ करावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!