Share

तिन वर्षानंतरही संत एकनाथ रंग मंदिराचे काम ८० टक्के पूर्ण, साडे पाच कोटींसाठी मनपाचा पाठपुरावा

Published On: 

औरंगाबाद : मागील तीन वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाने बंद असलेल्या संत एकनाथ रंग मंदिराचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, लवकरच संपूर्ण काम होऊन रंग मंदिर पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली. तसेच कामासाठी लागणाऱ्या उर्वरित साडे पाच कोटी रुपयांच्या निधीचा पाठ पुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील प्रचलित रंग मंदिर म्हणून संत एकनाथ रंग मंदिराची ओळख आहे. अनेक वर्षांपासून इथे विविध कार्यक्रम, नाटक होत होती. यात अनेक दिग्गज कलाकार देखील वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी तसेच प्रयोगांसाठी येऊन गेले. २०१६ साली नाटकाच्या प्रयोगादरम्यान रंग मंदिराच्या इमारतीत काही प्रमाणात पडझड झाली. त्यावेळी प्रशांत दामले यांनी रंग मंदिर नुतनिकरनचा सूर धरला. त्यानंतर कलाकार, रसिक यांनी आंदोलन छेडले.

तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी १ मे २०१८ रोजी नूतनीकरणासाठी संत एकनाथ रंग मंदिर बंद केले. त्यासाठी सुरुवातीला २ कोटी एवढा खर्च ठेवण्यात आला होता. परंतु तो खर्च कालांतराने वाढत जाऊन, साडे सात कोटीवर जाऊन पोहचला. त्यातील दोन कोटी रुपये शासनाने दिले. मात्र, साडे पाच कोटींचा पाठपुरावा मनपा करत असल्याची माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!