Share

कोरोनामुळे सलग दुसर्‍या वर्षी पाडव्याला परभणीमध्ये सराफा खरेदी – विक्री ठप्प

Published On: 

परभणी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी पाडव्याच्या मुहूर्तावरील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद होते. त्यामुळे पाडव्याला होणारी दुचारी- चारचाकी, इलेक्ट्रॉनीक साहित्यांसह सोने – चांदीच्या बाजार ठप्प पडला. याच बरोबर तेथील काम करणारे कारागिरांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

चैत्र पाडव्याच्या सणाला हिंदू संस्कृतीमध्ये प्रचंड असे महत्व आहे. विशेषतः मराठी नववर्षाच्या निमित्ताने पाडव्याच्या खरेदी विक्रीचे महत्व देखील मोठे आहे. कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा पाडवा असतो. त्यामुळेच सर्वस्तरावरील खरेदी-विक्रीचे व्यवहार तसेच, ग्रामीण भागातील शेतीतील सालगड्याचा नवीन करार करणे हे नियमीतरपणे मुहुर्तावर होत असते. मागच्या वर्षी कोरोना संसर्गाचा प्रसार खुप झपाट्याने वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन केले होते. तर यंदा देखील राज्य सरकारने अंशत: लॉकडाऊन, कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे पाडव्याला ही खरेदी ठप्प पडली आहे.

पाडव्याच्या मुहूर्तावर साधारण दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनाची, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर आदी वस्तुंची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. जिल्ह्यात दरवर्षी सर्वसाधारणपणे ११ ते १२ कोटी रुपयांची उलाढाल होत असते. सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे यावर्षी पाडव्याच्या मुहूर्तावरील सराफा बाजारातील ही उलाढाल अन्य व्यवहारांप्रमाणे ठप्प होती. शहर, जिल्ह्यात अंदाजे १ हजार 150 छोटी – मोठी सराफा दुकाने आहेत. सर्वसाधारणपणे या दुकानांमधुन साडेतीन हजारावर कारागीरांची संख्या आहे. सराफा – पेठेमध्ये पाडव्याचा मुहूर्तावर व्यवहार हा महत्वपूर्ण असतो. याच बरोबर लग्न मुहूर्त असतात. त्यामुळे लग्नाच्या दागिण्यांची खरेदींचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात असते. याहीवर्षी कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाने अन्य व्यापाऱ्यांप्रमाणे सराफा व्यापाऱ्यांना सुद्धा मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

यंदा लग्नाच्या सोहळ्याला सरकारने कमी नातेवाईक आणण्याच्या निर्बंध घातल्याने तसेच जेवणाच्या पंगतीवर देखील या मुळे कमी होवू लागले आहेत. त्यामुळे सर्व जाती – समाजामधील लग्न सोहळे साधेपणामुळे पार पडत असल्याने सोने, कपडा, फर्निचर, भांडे, किराणा, धान्य खरेदीवर याचा थेट परिणाम जाणवत आहे. त्यामुळे शहरीभागासह आता ग्रामीण भागामध्ये देखील छोटे – मोठ्या व्यापाऱ्यांना पाडव्याच्या या मुहूर्ताला खुप मोठा फटका बसला आहे. कोराना रुग्ण वाढीचा तसेच लॉकडाऊन, अंशत: लॉकडाऊन कडक निर्बंधामुळे सर्व व्यवसायांसह सोने – चांदी व्यवसायावर खुप मोठा फटका बसला असल्याचे जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सचिन अंबिलवादे यांनी सांगितले. सराफापेठेत 2016 च्या एक्साईज कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशात काळा दिवस पाळण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!