मुंबई : गेल्या वर्षीपासून देशासह जगभरात कोरोना या नव्या रोगाने हाहाकार माजवला होता. या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु आली. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका हा कायम असून या रोगाला पूर्णपणे आला घालण्यासाठी लॉकडाऊनचे नियम व कालावधी २८ फेब्रुवारी पर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.
आज राज्य सरकारने परिपत्रक काढून नव्या नियमावलीची माहिती दिली आहे. देशात लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी ब्रिटनमधील धोकादायक स्वरूपाचा आढळलेला कोरोनाचा संसर्ग संक्रमित होऊ नये यादृष्टीने अधिक खबरदारी बाळगली जात आहे. या दरम्यान आधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी सुरु राहतील असेही स्पष्ट करण्यात आलं आहे तर कंटेन्मेंट क्षेत्रातील लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.
राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत लॉकडाऊन लावण्यात आला होता. यानंतर कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत काही नियमांमध्ये शिथिलता करण्यात आली होती. त्यावेळी ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आली होती त्या आताही सुरु राहणार आहेत. पण कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊनचे नियम कायम ठेवण्यात आले आहेत.
या सूचना बंधनकारक
- सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
- सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक
- साबणाने सतत हात धुणे आवश्यक
महत्वाच्या बातम्या –
- ‘समान गुण असूनही प्रवेश मिळण्यास अडचण’, साष्टपिंपळगावच्या विद्यार्थ्यांची खंत
- ‘महाराष्ट्र देशा’ थेट साष्टपिंपळगावात, मराठा आरक्षण आंदोलनाच्या ठिणगीचे मशालीत रुपांतर
- खळबळजनक! खा.जलील 100 कोटींहून अधिकचा घोटाळा उघडकीस आणणार
- मुंबईकरांवर लोकल प्रवासासाठी वेळेचं बंधन; मनसेची खोचक टीका
- धनश्री काडगावकरच्या घरी चिमुकल्याचे आगमन


