🕒 1 min read
मुंबई: पावसामुळे वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता पूर संरक्षणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी एक शास्त्रशुद्ध कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर येथील पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
तसेच पूर ओसरल्यानंतर जलजन्य आजारांचा फैलाव होऊ नये म्हणून स्थानिक आरोग्य यंत्रणांनी तात्काळ खबरदारी घ्यावी. पात्रांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्याने नद्यांचे प्रवाह पूर्ववत होण्यासाठी मदत होईल यासाठी जलसंपदा विभागाने गाळ काढण्याबाबत उपाययोजना कराव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दरम्यान राज्यात पुरामुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत तसेच शेती तसेच इतर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून त्याचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात पावसामुळे १०९ मृत्यूंपैकी साठ टक्के मृत्यू वीज पडून झाले आहेत. यावरही मदत व पुनर्वसन विभागाने काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ‘त्या’ प्रकरणी नऊ दिवसांची ईडी कोठडी
- Sanjay Raut : “…डर के माध्यम से शोषण किया जाता है”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
- Presidential Election Result: देशाचे १५ वे राष्ट्रपती कोण?; आज होणार फैसला
- LLC 2022 : लिजेंड लीग क्रिकेटमध्ये खेळण्याबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी दिले उत्तर, म्हणाले…!
- Pratap Sarnaik : ठाणे आणि मिरभाईंदरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यानी 900 कोटी दिले – प्रताप सरनाईक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
