🕒 1 min read
भोपाळ : नेहमीच आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह(Digvijay Singh) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘जीन्स घालणाऱ्या मुलींना पंतप्रधान मोदी आवडत नाहीत, त्यांचा प्रभाव केवळ ४० वर्षांवरील महिलांवर आहे,’ असे आक्षेपार्ह विधान त्यांनी केले आहे. सिंह यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
शनिवारी(२५ डिसें.) मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये जन जागरण अभियानाच्या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतांना दिग्विजय सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) यांच्या ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या थीमसंदर्भात बोलत असतांना ते म्हणाले की,’जीन्स घालणाऱ्या मुली आणि फोन ठेवणाऱ्या मुलींना मोदी आवडत नाहीत. फक्त ४० ते ५० वयोगटातील महिलांवर मोदींचा प्रभाव आहे. तसेच २०२४ मध्ये भाजपा पुन्हा जिंकल्यास भारतीय राज्यघटना बदलली जाईल, आरक्षण संपेल’, असेही दिग्विजय सिंह यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे बोलत असतांना सिंग यांनी सावरकरांविषयी भाष्य केले आहे. ते म्हणाले की,’काही हिंदू लोक गोमांस खातात तर काही खात नाहीत. पण, स्वतः सावरकरांनी हिंदू आणि हिंदूत्व या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचे आपल्या पुस्तकामध्ये म्हंटले आहे. तसेच स्वतः सावरकर म्हंटले आहेत की, स्वतःच्या मल-मुत्रामध्ये गाय लोळतात तर गाय आपली माता कशी काय होऊ शकते? गोमांस खाणं वाईट नाही,’ असेही सिंह यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- “मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय या सरकारने”, सदाभाऊंचा हल्लाबोल
- ‘शिवसेनाप्रमुख कोण होते, तेही सांगून टाका?’, भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल
- “ऑक्सिजन प्लांट सज्ज करण्याच्या काळात झोपा काढल्या…”, भातखळकरांची टोपेंवर टीका
- ‘खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले’, शिवसेना आ.चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र
- “नवाब मलिक स्वतःला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश समजतात काय?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
