नवी दिल्ली: संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पावर (Finance Budget 2022) कॉंग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत, विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून शाब्दिक टीका केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितरामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, पगारी नोकरवर्ग, मध्यमवर्गीय आणि तरुणांसाठी कोणतेही प्रयोजन केले नसल्याचे म्हंटले आहे. तसेच आयकर स्लॅब (Income Tax) मध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे नमूद केले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी ट्विट करत हा अर्थसंकल्प, अर्थसंकल्पच नाही असे म्हंटले आहे. आपल्या संदेशात त्यांनी, गरिबांचे खिसे रिकामे आहेत, नोकरदार वर्गाचे खिसे रिकामे आहेत, मध्यम वर्गाचे खिसे रिकामे आहेत, शेतकरी कंगाल आहे, तुरूणांचा अपेक्षाभंग झाला आहे तसेच केंद्र सरकारने छोट्या उद्योगांना चालना देण्याचे काहीच प्रयोजन या संकल्पात केले नाही असे म्हंटले आहे.
अर्थमंत्री निर्मला सितरामन (Nirmala Sitaraman) यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प – २०२२ सादर केला. यात, नोकऱ्या, घरे, शिक्षण, शेतकरी, संरक्षण, व्यवसाय, आणि क्रिप्टो चलन यांसह बऱ्याच क्षेत्रात मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाचे पुढील २५ वर्षांसाठी ‘ब्लू प्रिंट’ असे वर्णन केले. तसेच २०१९ पासून केंद्रीय अर्थमंत्री पदाची सूत्रे सांभाळल्यानंतर सीतारामन यांनी चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मंत्री निष्क्रिय आणि मुख्यमंत्री घरी बसलेले असल्याने अंतर्गत मारामाऱ्या सुरु…”
- Budget 2022 : मानसिक आरोग्याच्या समस्यासाठी ‘राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ’ कार्यक्रम सुरू केला जाईल- निर्मला सीतारामन
- Budget 2022 : केमिकल फ्री शेतीला प्रोत्साहन देणारे-अतुल भातखळकर
- हॉकी प्रो लीग: भारतीय महिला संघाकडून चीनचा ७-१ने पराभव
- “अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दोन वर्ष फुकट गेली, याला सर्वस्वी जबाबदार मोदी सरकार”, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

