🕒 1 min read
औरंगाबाद : शहरातील ऐहिसिक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय महापालिकेने शिवप्रेमींच्या मागणीनंतर घेतला. मात्र, त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेने दोन वर्षापूर्वी येथील जुना पुतळा काढला. त्यानंतर चबुतरा बांधण्याचे काम हाती घेतले. मात्र पैसे वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटदाराने काही काळ काम थांबवले होते. येणाऱ्या १९ फेब्रुवारी २०२२ च्या आत या पुतळ्याचे काम पुर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा क्रांती मोर्चा तर्फे देण्यात आला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम संथ गतीने सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून शिवजयंती शिवरायांच्या पुतळ्याविना साजरा करण्यात आल्या आहेत. मात्र येणाऱ्या शिवजयंतीला तरी पुतळ्याचे काम पूर्ण झालेले असावे अशी अपेक्षा शिवप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. सध्या क्रांती चौकातील चबुतर्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती एकवीस फूट उंच व बावीस फूट लांब आणि सहा टन वजनाचा पुतळा पुण्यात तयार होत आहे. चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे व त्यांचे सहकारी हा पुतळा बनवत आहे.
पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच डिसेंबर किंवा जानेवारी २०२२ मध्ये क्रांती चौकात हा पुतळा बसविला जाईल. असे मनपातर्फे सांगण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी २०२२ च्या शिवजयंती पूर्वी पुतळ्याचे काम पूर्ण झाले नाही तर क्रांती चौकात आत्मदहनाचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे गणेश उगले यांनी दिला आहे. याठिकाणी काही बरे वाईट घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनाची असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या निवेदनावर गणेश उगले, प्रदीप नवले, अमोल साळुंके यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा न्यायालयांना लोकल रिट्स काढण्याचे अधिकार देण्याची मागणी
- समीर वानखेडे कोणत्याही पक्षासाठी काम करत नाहीत- क्रांती रेडकर
- समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरील नवाब मालिकांनी केलेले आरोप खोटे? कागदपत्रे आली समोर
- बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधणे महागात, सव्वा लाखाला ऑनलाइन गंडा
- रेस्टॉरंटमध्ये विसरली मुलाला; आयुषमानच्या पत्नीने सांगितला ‘तो’ किस्सा


