Share

‘नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम गतीने पूर्ण करा’, जयदत्त क्षीरसागरांचे दानवेंना साकडे

Published On: 

🕒 1 min read

बीड : नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे ३० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर ३० किलोमीटरचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी तातडीने चाचणी घ्यावी. उर्वरित बीड ते परळी रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली.

केंद्रीय मंत्री दानवे यांची औरंगाबाद येथे माजी मंत्री क्षीरसागर यांनी भेट घेतली. मुंबई ते नागपूर हा समृद्धी मार्ग सुरू होत आहे. या मार्गाच्या समांतर मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. देशात नवीन बुलेट ट्रेनसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. त्या नवीन मार्गात या मार्गाचा समावेश करण्यात यावा.

या रेल्वे मार्गामुळे मराठवाडा व विदर्भाचे दळणवळण सुधारेल आणि औरंगाबाद व नागपूर या शहरातील व्यापार व उद्योग वाढीसाठी मोठा फायदा होऊ शकेल. या नवीन रेल्वे मार्गाची योग्यता तपासून सर्वेक्षण करण्यात यावे, अशी विनंती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!