Share

‘त्या’ आरोपांवरून सोमय्यांविरोधात पोलिसांत तक्रार, १ रुपयाच्या मानहानीचा दावाही ठोकणार-अतुल लोंढे

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेची टक्केवारी सोमय्या यांनी डिबेटमध्ये जाहीर केली. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेपैकी ४० टक्के रक्कम शिवसेनेला मिळते.४० टक्के रक्कम राष्ट्रवादीला मिळते, तर २० टक्के रक्कम काँग्रेसला मिळते, असा आरोप केला होता.

यावर सोमय्या हे खोटे बोलतात, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सोमय्यांवर टीका केली. वरील आरोप करत असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नव्हते. सार्वजनिकरित्या असे खोटे आरोप करणं काँग्रेस खपवून घेणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली. सोमय्या नेहमीच खोटे आरोप करत असतात. त्यांनी केलेले खोटे आरोप रेक्रार्ड केले असून, याची तक्रार नागपूर पोलीस आयुक्तांकडे केल्याची माहिती लोंढे यांनी दिली.

राज्य सरकारवर केलेल्या आरोपाचे किरीट सोमय्या यांनी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. सोमय्यांविरोधात एक रुपयाचा मानहानीचा दावा नागपूरच्या न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेची सोमय्या यांना माफी मागावी लागणार असल्याचेही लोंढे यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!