मुंबई : सध्या महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेचे संकट आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.
तसेच बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे दोन डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी महाराष्ट्रात येणाऱ्यांकडून आरटीपीसीआर चाचणीचे सर्टिफिकेट घेतले जात होते. मात्र, आता या पुढे ज्यांनी कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसे सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ऑगस्टपासून कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना लोकलने प्रवास करता येणार असल्याची घोषणा केली आहे. यावरुन आता स्डँडअप कॉमेडिअन अतुल खत्री यांनी एक फोटो शेअर करत ट्विट केले आहे.
https://twitter.com/one_by_two/status/1424397067951116293?s=20
अतुल खत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर त्यांच्या टीशर्टवर कोविड-19 वॅक्सिनेशन सर्टिफिकेट प्रिंट असल्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ट्विट केलं आहे की, ‘काम आणि प्रवास आता पुन्हा सुरू झाला आहे. विमानतळावर, हॉटेल इत्यादी ठिकाणी कोरोना वॅक्सिनेशन सर्टिफिकेट दाखवून कंटाळा आल्याने ही कल्पना सुचल्याचं’ त्यांनी म्हंटल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार’; भाजपची टीका
- 102 व्या घटना दुरुस्तीत बदल करणारे विधेयक सरकार आज लोकसभेत मांडणार
- पुण्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर आता सोलापुरातील निर्बंध शिथिल करण्याची होतेय मागणी
- मराठा आरक्षण : पुण्यात आज राज्यस्तरीय बैठक; संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
- वाढदिवसाच्या मिरवणुकीत तलवार नाचवली,अबू आझमींसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

