Share

‘सर्वोच्च न्यायालयाने निकालातून पुढचा मार्ग दाखवला, केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा’

Published On: 

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं आहे. यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आरक्षण रद्द होण्याचं खापर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडलं आहे. दिवसभर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मराठा समाजाने दाखवलेल्या संयमाचे कौतुक करतानाच केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी मराठा समाजाच्या आरक्षणासाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची लढाई अजून संपलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा राज्य सरकारचाअधिकार नाही, असं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता पुढचा मार्ग दाखवला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सांगितलं आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नाही तर केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांना हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं या निकालातून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे,’ असं ठाकरे म्हणाले.

यासोबतच, ‘पंतप्रधानांनी जी संवेदनशीलता काश्मीरचे 370 कलम रद्द करताना दाखवली तीच संवेदनशीलता याबाबतीतही दाखवावी. वेळ आल्यास राष्ट्रपतींची भेट घेऊ. मराठा समाजाने असाच संयम बाळगणे गरजेचे आहे,’ असं भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!