भंडारा : राज्यातील कोरोनामुळे शालेय शिक्षण मंत्रालयाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यावर ओबीसी क्रांती मोर्चाने आक्षेप घेतला आहे. राज्यात निवडणुका चालते, आयपीएलच्या क्रिकेट मॅचेस चालतात, मग परीक्षा का चालत नाही, असा प्रश्न त्यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. निवडणुका, आयपीएल प्रमाणेच दहावीच्या परीक्षाही घ्या, अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाने केली आहे.
कोरोनामुळे सरकारने मागील परीक्षा न घेता प्रमाणपत्र दिले. आता सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएससी), महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यासह देशातील इतर राज्यातीलही परीक्षा मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु, दहावी ते पदवीधर शिक्षणापर्यंतच्या गुणपत्रिका यांचा विचार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अहवालात केला जातो. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात दहावीची परीक्षा रद्द केल्याने विपरीत परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने पदवी परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय दिला आहे. तोच निर्णय विविध मंडळांनी मान्य करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे दहावीची परीक्षा घेणे अपेक्षित आहे. कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर येत्या मे, जून किंवा जुलै महिन्यात परीक्षा घेणे शक्य आहे. त्यामुळे सर्व मंडळांनी इयत्ता दहावीची परीक्षा घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना रोखण्यासाठी राज्यातील दीड हजार माजी आमदार देणार एका महिन्याचे वेतन
- ‘माझ्याशी लग्न कर’ म्हणत मुलीचा विनयभंग, आरोपीला तीन वर्षांची शिक्षा
- ‘खा.हीना गावित स्वत:च्या नादात मोदींचा करिश्मा विसरल्या’
- ‘भुजबळांना धमकी देणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा’
- ‘चंद्रकांत पाटलांनी नाथाभाऊंच्या कामाचे श्रेय घेऊ नये’, रोहिणी खडसेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

