🕒 1 min read
मुंबई : मराठवाड्यात शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र कायम असून मागील तीन महिन्यांमध्ये २३३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ७१ आत्महत्या बीड जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘मराठवाड्यात गेल्या ३ महिन्यात २३३ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याच्या हेक्टरी ५० हजार मदतीच्या मोफत विजेच्या मारलेल्या थापांच्या भुलभुलैयात फसलेल्या बळीराजाची ही शोकांतिका आहे.ठाकरे सरकारचा निषेध’, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
मराठवाड्यात गेल्या ३ महिन्यात २३३ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे
निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याच्या हेक्टरी ५० हजार मदतीच्या मोफत विजेच्या मारलेल्या थापांच्या भुलभुलैयात फसलेल्या बळीराजाची ही शोकांतिका आहे..
ठाकरे सरकारचा निषेध pic.twitter.com/6gnQqqOPjN
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 30, 2022
दरम्यान, २०२० मध्ये ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तसेच २०२१ या वर्षात मराठवाड्यातील ८८७ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केली होती. त्यात २०२२ च्या तीन महिन्यांमध्येच २३३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “त्यांच्या गुळगुळित मेंदुवर सुरकुत्या पडून…”, चित्रा वाघ यांच्या टीकेवर शिवसेनेचे प्रत्युत्तर!
- IPL 2022 RR vs MI : फक्त तुझ्यासाठी शेन वॉर्न..! आज राजस्थान रॉयल्स करणार ‘ही’ गोष्ट; मुंबईचे खेळाडूही पाहत राहणार!
- “बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला ठेच पोहचत असेल..” ; केंद्रीय मंत्र्यांची शिवसेनेवर टीका
- “अख्खा शिवसेना पक्षच राष्ट्रवादीला भाड्याने…”, राम सातपुतेंचा संजय राऊतांना टोला
- “उद्धव ठाकरेंची अवस्था ‘गजनी’ सारखी…”; संदीप देशपांडेंचं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
