मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरुन चांगलेच राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत ९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार असल्याचे जाहीर केले. या विमानतळाच्या उद्घाटनासोबतच श्रेयवादावरुनही राजकारण गरम झाले आहे.
नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत म्हटले होतं की, मी ज्योतिरादित्य सिंधियांना भेटलो आणि विमानतळ उद्घाटनाचा वेळ घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलावणार का? यावर राणेंनी म्हटलं होतं, ‘मुख्यमंत्री पाहिजेत असं नाही’. राणेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेने भाजपवर टीका सुरू केली आहे.
या सर्व घडामोडींवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ‘चिपी विमानतळ तयार करण्यामध्ये राणे यांचा सहभाग कुणीच नाकारु शकत नाही. राणे यांच्या काळात विमानतळाच्या कामाची सुरुवात झाली. मी मुख्यमंत्री असताना ते काम पूर्ण झालं. त्याचं एक उद्घाटन आम्ही केलं आहे. आता तिथून विमान उडणार आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की या परिस्थितीत हा वाद न करता, कोकणाच्या विकासासाठी आणि कोकणाच्या पर्यटनाला खऱ्या अर्थानं चालना देणारं अशाप्रकारचं हे विमानतळ, याच्यावर फ्लाईट सुरु होणं हे कोकणासाठी अत्यंत महत्वाचं आहे. राणेंचे आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं अभिनंदन करतो. राज्य आणि केंद्राने समन्वयानेच काम करायचं असतं. त्यामुळे श्रेयवादाची लढाई नाही. राणेंचं योगदान कोणी नाकारु शकत नाही असे फडणवीस म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुंबई महापालिकेच्या शाळेत केंब्रिज बोर्ड सुरू होणार’, आदित्य ठाकरेंची घोषणा
- मुख्यमंत्र्यांचे ‘खास’ नार्वेकर यांचा बंगला तोडला, आता परब आणि सरनाईक यांचा नंबर – सोमय्या
- पुरुषप्रधान संस्कृती मागे टाकत ५ मुलींनी आपल्या आईच्या पार्थिवाला दिला खांदा
- ‘न सांगताही नांदेडमध्ये हजारो लोक जमा झाले, सांगून बघू का?’ मग बघा!
- माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे, त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत – सोमय्या


