🕒 1 min read
औरंगाबाद: राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद रंगला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. यावरच रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना सल्ला देत म्हटले आहे की, दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. त्यामुळे शिवसेना-भाजपने एकत्र यायला पाहिजे. मात्र मुख्यमंत्री ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेरले आहेत.
तसेच मुख्यमंत्र्यांची अनेकदा तब्येत ठिक नसते. अनेक वेळ आजारी असतात. निर्णय घेता येत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घेरलेलं आहे. त्यामुळे त्यांना जे निर्णय घ्यायचे होते, ते होऊ शकले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्युहातून बाहेर पडणं आवश्यक आहे, असेही आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेनेने भाजपसोबत मैत्री केली पाहिजे. शिवसेनेच्या भविष्याचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करून शिवसेनेने भूमिका बदलली पाहिजे. यासाठी मीसुद्धा प्रयत्न करणार आहे. यासाठीच मी संजय राऊत यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “भाजप भारतीय संस्कृती आणि राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”, सचिन सावंतांनी केला व्हिडिओ पोस्ट
- “आम्ही साहाला पत्रकाराचे नाव विचारून कारवाई करू”; बीसीसीआय अधिकाऱ्याचे वक्तव्य
- “…यावेळी तरी मनाचा कोतेपणा दाखवू नका”, भातखळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- रात्री १२ वाजता भाजप नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
- निवृत्ती घेण्याआधी धोनी चहरला भेटला होता; आणि सांगितली हि मोठी गोष्ट!


