पुणे : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल. १० मार्चनंतर महाविकास आघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल. कारण ठाकरे सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी केले होते. दरम्यान, पाटलांच्या या वक्तव्यावर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली असून तुम्ही पाटील आहात, मग जोशीबुवांचं काम कधीपासून करायला लागलात?, असा खोचक सवालही भुजबळांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना छगन भुजबळ म्हणाले की,‘तुम्ही पाटील आहात, मग जोशीबुवांचं काम कधीपासून करायला लागलात?राज्यामधीलच नाही तर देशातील अनेक ठिकाणची सरकारं पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्यात ते कधीच यशस्वी होणार नाहीत.’ तसेच गोव्यात उद्या मतदान होत असून तेथे भाजप सोडून सर्वच सत्तेवर येतील, असेही भुजबळ म्हणाले.
दरम्यान, पाटलांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून चंद्रकांत पाटील यांना फ्रस्ट्रेशन आले आहे. आता १० मार्च नंतर पाच राज्यांच्या निवडणुका येतील मग ते सरकार पडेल. या अगोदर पश्चिम बंगालच्या निवडणुका होत्या. मात्र काही झाले नाही. त्यांचे प्रयत्न त्यांनी विविध माध्यमातून सुरु ठेवावे. ईडी , सीबीआय अशा माध्यमांतून त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवावेत, असे राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- “हिंदुस्थानी भाऊला आपणच मोठं करतो’, उदय सामंत यांचे मोठे वक्तव्य
- ‘नोटीसा काढणारेच नंतर तुरुंगात जातात’; किरीट सोमय्यांचा टोला
- IPL AUCTION 2022: राजस्थान सोडत जयदेव मुंबईत ‘आला रे’
- IPL auction 2022 : वेस्ट इंडीजचा ओडीन पंहिल्यांदाच आयपीएल ऑक्शन मध्ये उतरला आणि थेट कोटीच्या घरात गेला
- इलेकट्रीक कारवरून नितीन गडकरी यांनी एलॉन मस्कला सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

