🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडी सरकार यांच्या काळात गोगरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. मात्र, ही योजना आता बंद करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली होती. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय एकनाथ शिंदे-देवंद्र फडणवीस सरकारला आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडी सरकार यांच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगितीः
शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, मात्र, योजनेत गैरव्यवहार असल्याच्या तक्रारींवर चौकशी होईल असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाली आणि शिंदे-फडणवीस सरकार आली. यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली. तर काही निर्णयांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
शिवभोजन थाळी बंद करण्यासाठी प्रस्तावः
दरम्यान, शिवभोजन थाळी बंद करण्यासाठी प्रस्ताव मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. मात्र, याबाबत शिंदे सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. राज्यात एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते.
महत्वाच्या बातम्या :
- Mangal Prabhat Lodha | “राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात महाराष्ट्राची कामगिरी अभिमानास्पद”, मंगलप्रभात लोढा
- Devendra Fadnavis | निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार – देवेंद्र फडणवीस
- Pankaja Munde । मोदींनी ठरवलं तरी मला संपवू शकत नाही, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने खळबळ
- Deepak Kesarkar | मुंबई शहर आणि जिल्ह्याच्या पर्यटनासाठी ‘सहल मुंबईची’ ॲप लॉन्च
- Shivsena । “भाजप मुंबईत दांडियाचे आयोजन करून मराठी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करतंय”; शिवसेनेचा थेट आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
