मुंबई: दादरा-नगर हवेलीमध्ये शिवसेनेने विजय मिळविला. राज्याबाहेर हा शिवसेनेचा पहिलाच विजय आहे. त्यामुळे आता शिवसेनेसाठी दिल्ली दूर नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. आता यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत राऊत यांना चांगलाच टोला लगावला आहे.
डेलकर कोण आहेत? ते आधीपासून शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का? मिळालेली मतं शिवसेनेची आहेत का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेला विजय मिळाला. पण, डेलकर शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का? ते सातवेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे दिल्लीच्या राजकारणात जाणार हे दावे हास्यास्पद आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
दरम्यान महाराष्ट्र सरकारने इंधनावरील कर कमी करायला पाहिजे. मात्र, त्यांनी तो दर कमी केला नाही. शेवटी केंद्राने दर कमी केला होता. कोरोनापासून इंधनापर्यंत सर्व गोष्टींकडे केंद्राकडे बोट दाखवतात. राज्य सरकार पेट्रोल -डिझेलबाबत सकारात्मक भूमिका घेणार नाही. कारण, त्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही. अशी प्रतिक्रियाही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते ‘TV9 मराठी’ सोबत बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने पेट्रोल-डिझेल शुल्क कपात केले, आता राज्य सरकारनेही जबाबदारी पार पाडावी – चित्रा वाघ
- T20 WC: भारतीय संघ अजूनही गाठू शकतो उपांत्यफेरी; जाणून घ्या कसं!
- केंद्राप्रमाणे राज्यात 5 व 10 रुपये कपात व्हायलाच हवी पण..; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- अजित पवार बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा- किरीट सोमय्या
- मलिक पुन्हा करणार एक गौप्यस्फोट, ‘मिलते है रविवार को’ म्हणत दिला इशारा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

