Share

पवार माढ्याला गेले आणि घोषणा करून मागे फिरले; पवारांच्या टीकेला चंद्रकांतदादांचे प्रत्युत्तर

Published On: 

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात अनेकदा शाब्दिक वाद होत असल्याचे दिसून येते. चंद्रकांत पाटलांची कोथरूड मतदारसंघातील आमदारकीची उमेदवारी टीकेचे कारण होत असल्याचे बऱ्याचदा दिसून आले. काल, शरद पवारांनी पाटलांवर टीका करताना पुन्हा एकदा याच मुद्द्यावर हात घातला.

शरद पवार यांना काल माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण प्रकरणी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेसंदर्भातील प्रश्न केला असता, ‘ज्यांना गाव सोडून लढावे लागते, त्यांना काय उत्तर द्यायचे,’ असा टोला लगावला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.

‘मी काल शरद पवार यांच्याकडून पुजा चव्हाण प्रकरणात न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी त्यावर असे उत्तर देणे अपेक्षित नव्हते. मी कोथरूडला गेलो, ठीक ! पण, तेही माढ्याला गेले. एकदा घोषणा करून मागे फिरले. त्याचे उत्तर त्यांनी द्यावे. ते मुंबईत राहतात. त्यांचे मतदार यादीतील नाव मुंबईत आहे. बाहेर जावून राहणे यात चूक आहे, पक्ष हितासाठी ते करावे लागते’ असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!