पुणे : राज्यातील शाळा 4 तारखेपासून सुरु करण्याचा निर्णय झाला आहे, मात्र पालकांची आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही. दिवाळीनंतर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. लहान मुलांच्या लसीबाबत राज्याने निर्णय घेणं उचित नाही. जोपर्यत केंद्राच्या पातळीवर निर्णय होत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. केंद्र सरकारने लहान मुलाच्या लसीकरणाबाबत लवकरात लवकर कळवावं, असं राज्याचे उपमुख्ममंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांनी पुण्यामध्ये कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
सध्या पुणे शहरात कोरोना रुग्णवाढीचा दर हा 2.1 टक्के इतका आहे. या आठवड्यात लसीकरणामध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरा डोस घेतो तो व्यक्ती कोरोनाचे नियम पाळत नसल्याचं दिसून येतंय असं सांगत नागरिकांनी मास्कचा वापर करावा, काळजी घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
मराठवाडा मध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे. पण त्या ठिकाणी काही तालुके पूर्ण बाधित झाले आहेत तर काही ठिकाणी पूर्ण तालुके बाधित झाले नाहीत. राज्य सरकारने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत, विमा कंपन्याना सूचना दिल्या आहेत. मराठवाड्यात खूप नुकसान झालं आहे. त्याची आपण माहीत घेतोय. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंबंधी आम्ही सकारात्मक आहोत. मराठवाड्यातील पूरस्थिती ही जलयुक्त शिवारमुळे झाली असं काही तज्ञ म्हणतात. हे तपासून घ्यावं लागेल. या योजनेवर कॅगने या आधीच शंका उपस्थितीत केली आहे. आता हा नवीन मुद्दा उपस्थितीत झाला आहे. त्याची आधी चौकशी करु आणि मग पाहू, असं अजित पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात आनंदराव अडसुळ यांची हायकोर्टात धाव
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- तुम्ही दिल्लीचा गळा दाबला, शहरात येण्याची परवानगी मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांनाच फटकारलं
- नवऱ्याने मारहान करणे याला कौटुंबिक हिंसाचार म्हणतात हेच महिलांना माहित नाही; चित्रा वाघ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

