Share

‘केंद्र सरकारने कृषी कायदे रेटले, दिल्लीत बसून शेती करता येत नाही’

Published On: 

नवी दिल्ली : देशात नव्या कृषी कायद्यांवरून ऐन थंडीत वातावरण तापलं आहे. जवळपास महिनाभर कडाक्यातील थंडीत दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची देखील भेट घेतली होती. त्या शिष्टमंडळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, द्रमुक नेते टीकेएस एलानगोवन या नेत्यांचा समावेश होता.

यानंतरही अद्याप तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महिना झाला असून शरद पवार हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. त्यांनी केंद्र सरकारला ३० डिसेंबर म्हणजेच उद्यापर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर, ‘राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही’, असे खडेबोल शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!