Share

“मुख्यमंत्र्यांवर टीका करा आणि Y दर्जाची सुरक्षा मिळवा ही केंद्र सरकारची…”, नीलम गोऱ्हेंची टीका

Published On: 

🕒 1 min read

तुळजापूर: विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्याला केंद्र सरकारने सुरक्षा देण्याची योजना जाहीर केल्याचा टोला लगावला आहे. कंगना रनौत, नवनीत राणा, किरीट सोमय्या हे या योजनेचे लाभार्थी असून ज्या व्यक्तींना संरक्षण हवे आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांवर बोला, टीका करा आणि Y दर्जाची सुरक्षा मिळवा, अशी योजना सुरु असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. त्या तुळजापूर येथे बोलत होत्या.

तसेच विकासाच्या प्रश्नापासून लक्ष विचलित करून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मशिदीवरील भोंगे तसेच हनुमान चालीसा पठण हा मुद्दा समोर आणला जात असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. यातून त्यांनी अप्रत्यक्ष  राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

तसेच उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे संभाजीनगर हे नामांतर करण्यासाठी अनेक ठराव शिवसेनेने मांडले. मात्र केंद्र सरकारच्या दुजाभाव आणि दुटप्पी भूमिकेमुळे नामांतर होत नसल्याची टीकाही नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. नामांतर करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!