मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषेद घेवून मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांची माहिती दिली. सध्या महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेचे संकट आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.
तसेच मुंबईची लाईफलाईन असलेले लोकल सेवा सुद्धा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंदच आहे. लसींचे दोन डोस घेतले असतील लोकल प्रवासासाठी मुभा द्यावी अशी मागणी होत होती, पण राज्य 3 लेव्हलमध्ये असल्यामुळे कोणतीही सूट दिली जाणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे आता सर्वसामन्य मुंबईकरांना सुलभ लोकल प्रवासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
तसेच बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे दोन डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे. तसा निर्णय घेण्यात आले असल्याचे राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. दरम्यान यापूर्वी महाराष्ट्रात येणाऱ्यांकडून आरटीपीसीआर चाचणीचे सर्टिफिकेट घेतले जात होते. मात्र, आता या पुढे ज्यांनी कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसे सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश देणार’ ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
- महाराष्ट्राला धोका कायम ; राज्यात अनलॉक नाहीच !
- शुभमंगल सावधान! लग्नाला ५० पेक्षा जास्त लोक, वधूपित्याला हजारोंचा दंड
- मोदींपुढे शरद पवार हेच सक्षम पर्याय ठरू शकतात, संजय राऊतांचे मोठे विधान
- औरंगाबादेत आता गरिब घरातील मुलेही सीबीएसई माध्यमातून शिकू शकतील, मनपाचा स्तुत्य पुढाकार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
