Share

२०२४ पर्यंत पाकयुक्त काश्मीर भारतात असेल; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

ठाणे: नरेंद्र मोदी, कांदे आणि बटाटयाचे भाव कमी करण्याकरिता पंतप्रधान झाले नाहीत. लोक त्याच दृष्टीकोणातून त्यांच्याकडे पहातात. ते अगोदर बदलले पाहिजे. असे वक्तव्य केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी भिवंडीत एका कार्यक्रमात बोलताना केले. तसेच मोदींच्या नेतृत्वाखाली २०२४ सालापर्यंत पाकिस्तानने (Pakistan) गिळंकृत केलेला काश्मीरचा (Kashmir) भाग भारतात असेल अशी आशा सुद्धा व्यक्त केली.

२०२४ मध्ये काहीतरी चांगले होण्याचे संकेत आहेत. पाकयुक्त काश्मीर भारताचा भाग होईल, आणि नरेंद्र मोदीच हे करून दाखवतील असे देखील ते म्हणाले. पण त्यागोदार आपण आपली त्यांच्याकडे पहाण्याची दृष्टी बदलली पाहिजे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाच (Amit Shah) देशासाठी महत्वाच्या गोष्टी करू शकतात, महत्वाचे निर्णय घेऊ शकतात. कलम ३७० रद्द करणे, (Article 370) नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आदी महत्वाचे निर्णय घेतल्याने त्यानीच पुढे या देशाचे नेतृत्व करावे असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!