🕒 1 min read
जळगाव : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली असून राज्यांच्या निवडणुकांमध्ये यश मिळालं म्हणजे भाजपला महाराष्ट्रातही यश मिळेलच असं नाही, असे पाटील म्हणाले आहेत.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना गुलाबराव पाटील म्हणाले की,‘देशातल्या चार राज्यांत भाजपला निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. यामुळे नक्कीच त्यांची स्फूर्ती वाढली आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील निवडणुकीत ते बहुमत मिळवतील असा होत नाही. महाराष्ट्रातील निवडणुकांना दोन ते अडीच वर्षांचा काळ आहे. राजकारणात रोज बदल होत असतो. त्यामुळे राज्यांच्या निवडणुकांमध्ये यश मिळाले तर भाजपला महाराष्ट्रातही यश मिळेल असं नाही’, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विधानसभेत बोलत असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यातील सरकार विरोधकांना विविध प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र रचत असून या कामात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavhan) यांना हाताशी धरले आहे असा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणावर प्रतिक्रिया देत पाटील म्हणाले की,‘या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्यावर बोलणे उचित होणार नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यासंदर्भात विधानसभेत सोमवारी खुलासा करणार आहेत. त्यानंतर याप्रकरणातील नेमके सत्य काय ते बाहेर येईल. म्हणजेच दूध का दूध पानी का पानी होईलच.’
महत्वाच्या बातम्या
- पहिल्याच दिवशी ‘द काश्मीर फाइल्स’ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, प्रेक्षकांना अश्रू अनावर
- इरफान पठाणचे, श्रेयस अय्यरच्या खेळीबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाला…
- “…त्यानंतर दूध का दूध, पानी का पानी होईल”, फडणवीसांच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
- शॉर्टसर्किटने उस जळाला? तर अशी मिळवा आर्थिक मदत!
- “देवेंद्र फडणवीसांचे तोंड बंद करण्यासाठी ही नोटीस”- अनिल बोंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
