🕒 1 min read
सातारा : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.
या वादावर अनेक नेते रोज प्रतिक्रिया देत आहेत. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘बॉम्बेचं मुंबई झालं मग औरंगाबादचं संभाजीनगर का नाही ? राजेशाही असती तर माझं मत व्यक्त केलं असतं’, असं भाष्य त्यांनी केलं आहे.
दरम्यान,पोवई नाका येथील ग्रेडसेप्रेटरचे काम पूर्ण झाले असून मान्यवरांच्या हस्ते उदघाटन राखडल्यामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. हे समजताच उदयनराजेंनी पाहणी करून अचानक छत्रपती संभाजी महाराज असं नाव असलेल्या या ग्रेडसेप्रेटरचं उदघाटन करून हा मार्ग सामान्यांसाठी खुला करून दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी , मात्र शरद पवारांनी आपलंसं केलं
- शिवसेनेच्या खासदाराने केला छत्रपती संभाजी महाराजांचा ‘एकेरी’ उल्लेख
- औरंगाबाद काँग्रेस नेत्यांची शिवसेनेवर टीका; मनपा निवडणुकीतील आघाडीवर प्रश्नचिन्ह
- शेतकऱ्यांनी दिला ‘जिंकू किंवा मरू’चा नारा; सरकार-शेतकरी यांच्यातील आठवी फेरी देखील निष्फळ
- कंगनाने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोप धुडकावले !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

