औरंगाबाद : देशात असलेल्या वाढत्या महागाईविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाेचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेतृत्व केले आहे. ‘आमचंच सरकार मंत्रालयात आणि शिवसेना रस्त्यावर, असं संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
‘महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणं राज्य सरकारच्या हातात नाही, पेट्रोलियम कंपन्या महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या नाहीत, त्यामुळे दर कमी करणं हे केंद्र सरकारचं काम आहे’, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
केंद्र सरकार राज्य सरकारची आर्थिक कोंडी करत आहे. सरकार पाडण्यासाठी रोज भाजपची कारस्थाने सुरू आहेत. भाजपचे लोक महागाईबद्दल बोलत नाही. त्रिपुऱ्यात घडलेल्या कोणत्यातरी घटनेसाठी भाजपा महाराष्ट्रात आंदोलन करत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
१०० दिवसात महागाई कमी करण्याचं वचन दिलं होतं, मात्र तुमचं सरकार येऊनही तुम्ही महागाई कमी केलेली नाही. महागाई बद्दल विचारल्यावर भारत-पाकिस्तान, सर्जिकल स्ट्राईक, भारत-चीनबद्ल बोलतात आणि मुळ मुद्दा बाजूला ठेवतात, असा गंभीर आरोप राऊतांनी भाजपवर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मी पण अनेक वर्षे काम केले आहे, पण तत्वतः म्हणजे काय?- अजित पवार
- एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे
- पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दोन ट्रॅक्टरला लावली आग
- कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं- संजय राऊत


