Share

भाजपचे औरंगाबादेत शनिवारी चक्का जाम आंदोलन; आ. अतुल सावेंची घोषणा

Published On: 

औरंगाबाद: राज्यातील तिघाडी सरकारच्या गैरकारभारामुळे मराठा आरक्षण तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. याच्याच निषेधार्थ शनिवारी दि. २६ जून रोजी जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. शहरात आकाशवाणी येथे सकाळी दहा वाजता हे आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार अतुल सावे यांनी बुधवारी दि. २३ जून रोजी झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

आमदार सावे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात एम्पिरिकल डाटा दाखल करण्यासाठी दोन महिन्याची मुदत मागितली होती. मात्र दुर्दैवाने राज्यात सरकार बदलले आणि महाविकास आघाडी सरकार आले. या सरकार मधील मंत्र्यांनी दोन महिन्यात हा एम्पिरिकल डाटा करण्याची घोषणा केली. मात्र पंधरा महिने झाले तरीही अद्याप हा डाटा न्यायालयात दाखल केल नाही. यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले.

ओबीसी आणि मराठा सामाजाच्या आरक्षणाबाबत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविणे अपेक्षित होते. मात्र तिघाडी सरकार केवळ दोन दिवसांचेच पावसाळी अधिवेशन घेत आहे. या प्रकरणी वेळीच पावले उचलले नाहीत, तर ओबीसींचे शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षणही धोक्यात येईल असेही आमदार सावे यांनी सांगितले. यावेळी आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये व इतर मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!