Share

BJP । आदित्य ठाकरे यांच्या ‘या’ एका चुकीमुळे वेदांता गुजरातला गेला; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा थेट आरोप

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : वेदांता ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. यावरून राज्यातील विरोधी आणि सत्ताधारी पक्षनेते एकमेकांवर आरोप करत आहेत. एकमेकांवर टीकेबाजी देखील करत आहेत. अशातच भाजप पक्षाचे खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे.

काय म्हणाले उन्मेश पाटील –

विरोधी पक्षात आल्यानंतर तरुणांच्या भावना भडकावून त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे, असा कळवळा दाखवणं आदित्य ठाकरे यांनी बंद करावं, असं म्हणत उन्मेश पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. उन्मेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

पुढे ते असंही म्हणाले की, आता हे सगळं करण्यापेक्षा सत्तेत असताना आदित्य ठाकरे यांनी सेमी कंडक्टर पॉलिसी जर वेळेत आणली असती तर सेमी कंडक्टर इंडस्ट्री असणाऱ्या वेदांताला आपल्या राज्यात आणखी मदत मिळाली असती.

आदित्य ठाकरेंकडे तेव्हा पेंग्विन आणायला वेळ होता –

तसेच, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती ग्लोबल झाली पाहिजे ही आमची भावना आहे.मात्र जुन्या सरकारला त्यासाठी वेळ नव्हता. आदित्य ठाकरे कधी ग्रामीण भागाकडे फिरकले देखील नाहीत. जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा त्यांच्याकडे पेंग्विन आणायला, परदेशात फिरायला घरी बसायला वेळ होता, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!