मुंबई : महाराष्ट्र राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांवरून वातावरण चांगलच तापलं आहे. मार्च महिन्यात पुणे- मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ज्या १० शहरात महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यापैकी एक म्हणजे कल्याण -डोंबिवली महानगरपालिका होय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक पुढच्या महिन्यातच होत असून, त्या आधीच वातावरण तापले आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षाचा नेहमीच महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर प्रभाव पडत असतो. असाच काहीसा प्रकार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबाबतीत घडला आहे. शिवसेनेनी स्वतःला अनुकूल अशी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रभाग रचना केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे. शिवसेनेनी स्वतःला अनुकूल अशी प्रभाग रचना केली असून ती अत्यंत चुकीची असून काही प्रभागातून मतदारांची नाव पण गायब झाली आहेत असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.
शिवसेनेला आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक सोप्पी जावी म्हणून एकूण ८ प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने आखल्या असून cकेचा काही भाग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट केल्याचा आरोप गणपत गायकवाड यांनी केला आहे. शिवसेनेला जास्तीत जास्त कसे मतदान होईल याची शिवसेनेने खात्री केली आहे असाही आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘कोणाच्या घराबाहेर आंदोलन करणं…’ नवाब मलिकांचे सूचक विधान
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एजीबी घोटाळ्यावरून काँग्रेसवर निशाणा, म्हणाल्या…
- फडणवीसांच्या बंगल्यासमोर भाजप – कॉंग्रेसचे कार्यकर्ते भिडले; अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात
- भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड; हे आहे कारण
- रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे लवकरच भत्ता वाढवणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

