🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधला आहे. आज भाजप नेते किरीट सोमय्या कोर्लई गावात जाणार आहेत. कोर्लई गावात मुख्यमंत्री ठाकरे यांचे १९ बंगले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावरच शिवसेनेने आव्हान देता, आज सोमय्या कोर्लई गावात जनतेला वास्तव कळावे, यासाठी निघाले आहे. त्यावरच प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी भाजपला निशाण्यावर धरले आहे.
यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कोर्लई येथील जमिनीवर एकही बांधकाम, बंगला नाही. सोमय्या यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. भाजपाच्या लोकांना बहुतेक भुताटकीने झपाटलं आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक आहेत. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यासंबंधी हे लोक बोलत नाहीत. पण अन्वय नाईक यांना ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगाराच्या समर्थनार्थ हे सगळे लोक कोर्टबाज्या, पत्रकबाज्या करत होते, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांचा देशातील सर्वात मोठा चोर, लफंगा, डाकू असा उल्लेख केला आहे. तसेच भाजपचे लोक महाराष्ट्र आणि मुंईबतून मराठी उद्योजकांना संपवण्याचा प्रयत्न करत असून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व अन्वय नाईकचे हत्यारे असून आणि त्यांच्यातील एक हत्यारा त्या जमिनीवर चालला आहे. असे म्हणत सोमय्याअन्वय नाईक यांच्या आत्महत्या करण्यास कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “किरीट सोमय्यांना स्वप्नातही बंगले दिसतात”, संजय राऊतांची टीका
- …अशी बनवेगिरी करणाऱ्या सरकारचे काय करायचे, याचा फैसला आता जनतेनेच करायला हवा- संजय राऊत
- टेनिस बॉल क्रिकेटमधून थेट आयपीएलमध्ये खेळणार ‘हा’ खेळाडू
- पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अन्याय करणाऱ्या निर्णयात काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत शिवसेनाही- केशव उपाध्ये
- “…म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली”, भातखळकरांचा मनमोहन सिंह यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
