🕒 1 min read
मुंबई: पाकव्याप्त काश्मीर भारतात फक्त नरेंद्र मोदीच आणू शकतात. त्यामुळे महागाईसारख्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका करण्यात अर्थ नाही, असे वक्तव्य भाजपचे खासदार कपिल पाटील (BJP MP Kapil Patil) यांनी केले आहे.
दरम्यान कपिल पाटील शनिवारी कल्याणमध्ये व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, ‘कदाचित २०२४ पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर ( Pakistan-occupied Kashmir) भारतामध्ये येईल आणि या गोष्टी केवळ मोदी(Prime Minister Narendra Modi) करु शकतात त्यामुळे अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही’ असे म्हटले. मात्र यानंतर लगेच आपल्या वक्तव्याची सारवासारव करत त्यांनी “पंतप्रधान नरसिंहराव यांनी अशा प्रकारचा कायदा केला होता. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. त्याचा पुन्हा भारतामध्ये समावेश होणे, ही देशातील प्रत्येक नागरिकाची अशी मनोमन इच्छा आहे. त्याच्यासाठी आपण सर्वजण आशेवर आहोत, असा माझ्या विधानाचा अर्थ आहे” असे म्हटले.
दरम्यान कपिल पाटील यांनी महागाईवरील विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे. कांदे, बटाटे, तूरडाळ, मुगडाळ या सगळ्यातून आपण बाहेर पडले पाहिजे. देशच नसेल तर कांदे बटाटे कुठून खरेदी करणार? महागाईचे समर्थन कोणीही करु शकत नाही. पण कांदा आणि बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नाही असे कपिल पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “नाव सार्थकी लागले… मविआ-मद्य विक्री आघाडी”, सदाभाऊंचा खोचक टोला
- अभिनेत्री काजोलला कोरोनाची लागण; सोशल मीडिया पोस्ट करत दिली माहिती
- “आता रं…लोचा झाला की”, वाईनविक्री निर्णयावरील विरोधकांच्या टीकेला रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर
- “मुख्य सचिवानेच पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे उडविली, मुख्यमंत्री उत्तर देणार काय?” बावनकुळेंचा सवाल
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; कोविड न्यूमोनियाचे झाले होते निदान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
