मुंबई: सध्या मालाड येथील क्रीडा संकुलच्या नावावरुन भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार मध्ये चांगलाच वाद रंगला आहे. भाजप नेते राज पुरोहित (BJP leader Raj Purohit)यांनी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. आता या प्रकरणावरच राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (State Minority Minister Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“टिपू सुलतान यांचे नाव घेऊन भाजप वाद निर्माण करुन जनतेची दिशाभूल करत आहे. इंग्रजांशी लढत असताना टिपु सुलतान शहिद झाले. इंग्रजांशी लढत असताना कधीही त्यांनी हार मानली नाही. ते स्वातंत्र्यसेनानी होते. त्या काळात त्यांनी इंग्रजांना हादरुन सोडले होते. मात्र सध्या त्यांच्या नावाला विरोध करण्याचं काम भाजप करत आहे. कर्नाटकामध्येही भाजपने हीच परिस्थिती निर्माण केली होती. काही काळासाठी माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा (B.S. Yediyurappa) यांनी काही काळासाठी टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली होती. मात्र सत्ता आल्यानंतर विवाद निर्माण करण्यासाठी जयंतीचा कार्यक्रम रद्द केला”, असेही त्यांनी म्हटले आहे.
टिपू सुलतान हे इंग्रज साम्राज्याशी लढताना शहीद झाले. त्यांनी कधीही इंग्रजांसमोर शरणागती पत्करली नाही. ते एक स्वातंत्र्यसेनानी होते. असे एक महान व्यक्ती ज्यांनी इंग्रजांना हादरून ठेवले होते त्यांचा नावाचा विरोध करण्याचे काम भाजप करत आहे. pic.twitter.com/TI2Z6owxQn
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 27, 2022
तसेच नवाब मलिक यांनी यासंबंधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये राष्ट्रपती टिपू सुलतानबाबत सकारात्मक बोलताना दिसत आहेत. टिपू सुलतान यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल राष्ट्रपतींनी दिलेली माहिती भाजपच्या नेत्यांनी समजून घ्यावी असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण
- औरंगाबादेत येणारा पर्यटक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही-आयुक्त
- “डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले”
- “..मग तुम्ही राष्ट्रपतींनाही राजीनामा मागणार का?”, टिपू सुलतान वादावरून संजय राऊतांचा भाजपला सवाल
- डॉ. अवचट यांच्या रूपाने संवेदनशील लेखक, सामाजिक कार्यकर्ता आपण गमावला- केशव उपाध्ये


