औरंगाबाद : महाआघाडीतील तिन्ही घटक पक्ष म्हणजे गुळाला चिकटलेले मुंगळे आहेत. त्यामुळे ते सरकार टिकेल आणि कोणी बाहेर पडणार नाही. हे सरकार त्यांच्या कर्मानेच पडेल. मात्र त्यासाठी भाजप काय प्रयत्न करत आहे हे माहिती नसून भाजप कर्मकांडातच व्यस्त असल्याचा टोला विनायक मेटे यांनी लगावलाय.
औरंगाबाद येथे शिवसंग्राम संघटनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्य कार्यकारणीची बैठक शनिवारी पार पडली. शहरातील तापडिया नाट्य मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या उपस्थिती होती. यावेळी त्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपला टोले लगावत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा दिला.
राज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसंग्राम पक्ष लढवणार आहे, अशीही घोषणा विनायक मेटे यांनी केली. भाजपने सन्मानजनक वागणूक दिली, तर युती करू नाहीतर स्वबळावर निवडणूक लढवायची आहे, असेही ते म्हणाले. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढवणार आहे. युती होईल न होईल पण दोन आकडी नगरसेवक निवडून आणल्याशिवाय थांबणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- सातारा : ‘…अन्यथा भाजपला कायदा हातात घ्यायला लागेल’
- ऍपल आणि हुंदाई एकत्र करणार ई-वाहन निर्मिती
- सातारा : फलक फाडला ही घटना दुर्दैवी; शिवभक्तांनी शांतता राखावी – शंभूराज देसाई
- ‘भंडारा घटनेतल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबांना दहा लाखांची मदत दया’
- उदयनराजेंनी काल उदघाटन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज मार्गाचा फलक अज्ञातांनी फाडला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

