🕒 1 min read
मुंबई: राज्यात सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलेच रंगू लागले आहे. भाजपकडून सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांना संधी देण्यात आली आहे. त्यात मत फुटू नये, यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. येत्या १० जून रोजी यासाठी निवडणूक पार पडणार असून या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या प्रत्येकी दोन जागा व भाजप पक्षाच्या चार जागा रिक्त आहेत. एकूण दहा जागांसाठी उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. मात्र भाजपने चारऐवजी पाच उमेदवार जाहीर केले असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कंबर कसावी लागेल. असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या प्रत्येकी दोन जागा व भाजप पक्षाच्या चार जागा रिक्त आहेत. एकूण दहा जागांसाठी उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते.@ChhaganCBhujbal #RajyaSabhaElection pic.twitter.com/q0Og6UWATR
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 8, 2022
राज्यसभेच्या निवडणुकीतही एक उमेदवार अधिक असल्यामुळे सर्व पक्षांची तयारी सुरू आहे. या दोन्ही निवडणुकींसंदर्भात मंगळवारी महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष व मित्र पक्षांची बैठक मुंबई येथे पार पडली आहे. या बैठकीत आम्ही सर्वजण एकत्र राहून राज्यसभेवरील आमचे उमेदवार निवडून आणू. तसेच विधान परिषदेवर सुद्धा आमचे उमेदवार निश्चित निवडून येतील. विधान परिषद निवडणुकीसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अशी कोणतीही घटना घडणार नाही. असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “सोनियांच्या चरणी आणि पवारांच्या खांद्यावर…”, ‘त्या’ वक्तव्यानंतर भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- Rajya Sabha Election : “…त्यामुळे आमचा विजय आणखी सोपा होणार”, आशिष शेलार यांचे मोठे वक्तव्य
- भाजपकडून विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर, चंद्रकांत पाटील म्हणाले…
- नयनतारा आणि विग्नेशचे लग्न होणार कडेकोट सुरक्षितेत! पाहुण्यांना दिला जाणार विशेष ‘कोड’
- तिकीट नाकारल्यानंतर पंकजा मुंडेंना दिल्लीतून पक्षश्रेष्ठींचा खास निरोप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
