औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) औरंगाबादमधील सभेला अटीशर्तींसह परवानगी मिळाली असून सभेसाठी केवळ १५ हजार जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. तसेच या सभेसाठी पोलिसांनी १६ अटी घातल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचं जर राज ठाकरेंनी उल्लंघन केलं, तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील, असा इशारा भीम आर्मीने मनसेला दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचे जर राज ठाकरेंनी उल्लंघन केले, तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील. आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही. पण जो भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागेल, त्याच्याविरुद्ध आम्ही आहोत, असे भीम आर्मीने म्हंटले आहे.
राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी पोलिसांच्या अटी-शर्थी
१) ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे.
२) लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी.
३) इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
४) सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही.
५) 1 मे रोजी महाराष्ट्रदिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये.
६) व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी.
७) सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये, वाहन पार्किंगचे नियम पाळावे.
८) सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही.
९) सभेला येणार्या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल.
१०) सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये यासह आणखी काही अटी सभेला लागू राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- राणा दाम्पत्य यांच्या अडचणीत वाढ; जामिनाला पोलिसांकडून कडाडून विरोध
- “मोदींकडून महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- “…तर त्याचे पालन महाराष्ट्रात का होत नाही?”, अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल
- “नवाब मलिक जेलमध्ये तरी मंत्री मंडळाच्या निर्णयावर…”, निलेश राणेंनी ठाकरे सरकारला सुनावले
- “उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नसून तिथे…”, योगी सरकारने केलेल्या ‘त्या’ कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

