🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निर्देशांनुसार उत्तर प्रदेशमध्ये ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘उत्तर प्रदेशातील भोंगे उतरवण्यात आले नसून तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आलेले आहे. अशाच प्रकारचे पालन महाराष्ट्रातही करण्यात यावं, अशीच सरकारची भूमिका आहे.’ तसेच ही सर्व भोंगेबाजी असून आता योगी कोण? भोगी कोण? आणि हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, ‘उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’. तसेच महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना,’ असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे योगी सरकारने केलेल्या भोंग्याच्या कारवाईवर बोलतांना म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “…असे म्हणणे महाराष्ट्राचा अपमान नाही का?”, सचिन सावंत यांचा राज ठाकरेंना सवाल
- “ज्यांचं संपूर्ण राजकारणच खोटेपणावर अवलंबून…”, ‘त्या’ प्रकरणावरून केशव उपाध्येंचा शरद पवारांना टोला
- “योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय”, संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला
- “राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव यशस्वी…” – एकनाथ खडसे
- “…हे पवार साहेबच करू शकतात”, ‘त्या’ प्रकरणावरून निलेश राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
