Share

राणा दाम्पत्य यांच्या अडचणीत वाढ; जामिनाला पोलिसांकडून कडाडून विरोध

Published On: 

मुंबई : नवनीत राणा व रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. हनुमान चालीसा पठण नंतर राज्य सरकारच्या यंत्रणेलाच आव्हान दिल्याच्या आरोपाखाली भारतीय दंड संहितेतील १२४-अ हे राजद्रोहाचे अत्यंत गंभीर कलम लावण्यात आले.

या पाश्वर्भूमीवर राणा दाम्पत्याने जामिनासाठी अर्ज केल्यानंतर कोर्टाने आज २९ एप्रिल रोजी राज्य सरकारला उत्तर दाखल करण्यास सांगितळे होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून राणा पती-पत्नीविरोधात चांगलीच मोर्चेबांधणी करण्यात आली असून कोर्टात पोलिसांकडून या दोघांच्या जामिनाला कडाडून विरोध केला जाणार असल्याची दाट शक्यता आहे. राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर आल्यास पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, असं सांगत पोलिसांकडून त्यांना जामीन मिळू नये, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते. कोर्टाच्या सूचनेनंतर सरकारकडून राणा दाम्पत्य प्रकरणावर आज उत्तर दाखल केलं जाईल. मात्र कोर्टाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला दिलासा मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

तसेच नवनीत राणा रवी राणा यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. यावेळी कोर्टाकडून राणा दाम्पत्याला दिलासा देण्यात येईल? की जामीन अर्ज  फेटाळला जाईल? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच जामीन मिळावा यासाठी राणा दाम्पत्याने न्यायदंडाधिकारी कोर्टात अर्ज केला होता. हा अर्ज प्रलंबित असताना आणि त्यावर सुनावणी होणं बाकी असतानाही त्यांनी सेशन्स कोर्टातही जामीन अर्ज केला होता.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!