मुंबई: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निर्देशांनुसार ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. यावरूनच उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नसून तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ट्वीट करत संजय राऊतांना खोचक सवाल केला आहे.
“जनाब संजय राऊत सर्वोच्च न्यायालयाचा असा काही निर्णय असेल तर मग त्याचे पालन महाराष्ट्रात का होत नाही?”, असा प्रतिसवाल अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत संजय राऊत यांना केला आहे.
जनाब संजय राऊत सर्वोच्च न्यायालयाचा असा काही निर्णय असेल तर मग
त्याचे पालन महाराष्ट्रात का होत नाही? pic.twitter.com/OC0qLOBAh2— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 29, 2022
नेमके काय म्हणाले संजय राऊत?
“उत्तर प्रदेशातील भोंगे उतरवण्यात आले नसून तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे. अशाच प्रकारचे पालन महाराष्ट्रातही करण्यात यावं, अशीच सरकारची भूमिका आहे. तसेच ही सर्व भोंगेबाजी असून आता योगी कोण? भोगी कोण? आणि हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय आहे”, असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या:
- “उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नसून तिथे…”, योगी सरकारने केलेल्या ‘त्या’ कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया!
- “राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव यशस्वी…” – एकनाथ खडसे
- अकलेचा आणि तुमचा काडीचा तरी संबंध आहे का?; मुरलीधर मोहोळ यांचा संजय राऊतांवर निशाणा
- “योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय”, संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला
- “ज्यांचं संपूर्ण राजकारणच खोटेपणावर अवलंबून…”, ‘त्या’ प्रकरणावरून केशव उपाध्येंचा शरद पवारांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

