Share

कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्यापूर्वी निवड समितीने ‘या’ दोघांचा नाही घेतला सल्ला!

Published On: 

नवी दिल्ली : भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीची हकालपट्टी झाल्यापासून अनेक गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. त्याच संबंधित आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. एका वृत्तानुसार, निवडकर्त्यांनी विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून काढून टाकण्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याशी चर्चा केली नाही.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, कोहलीला कर्णधार पदावरून हटवण्याबाबत निवडकर्त्यांनी सौरव गांगुली आणि जय शाह यांच्यासोबत कोणतीही चर्चा केली नाही. तसेच विराट कोहलीलाही स्वतःहून कर्णधारपद सोडण्यास सांगितले गेले नाही किंवा त्याला असा कोणताही अल्टिमेटम मिळालेला नाही.

त्याचवेळी बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वी सांगितले होते की, कोहलीबाबतचा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीने एकत्रितपणे घेतला आहे. हा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीने मिळून घेतल्याचे गांगुली म्हणाला. विराट कोहलीला बीसीसीआयने टी-२० कर्णधारपद सोडू नये, अशी विनंती केली होती पण तो यास मान्य झाला नाही. एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटमध्ये दोन कर्णधार असणे निवडकर्त्यांना योग्य वाटले नाही. त्यामुळे विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार आणि रोहित शर्मा एकदिवसीय आणि टी २० कर्णधार म्हणून काम पाहणार हे निश्चित झाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!