नाशिक : नाशिकच्या सटाणा नगर परिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी दगाजी चित्रमंदिर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना आठवले यांनी युतीबाबत भाष्य केले.
ते म्हणाले, ‘महाराष्ट्राचे राजकारण असे आहे की, कोणताही पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे चारही मोठे पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही. सत्तेसाठी दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन युती करावी लागते. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने युतीची भूमिका स्वीकारत राजकारण करत आहे.
‘१९९८ साली काँग्रेससोबत आघाडी केल्याने रिपाईचे चार खासदार निवडून आले होते. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी राजकीय निर्णय घेत असतो. केंद्र सरकारमध्ये मी सहभागी झाल्यापासून संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष वाढला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी, आसामपासून गुजरातपर्यंत संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष वाढला आहे , असे रामदास आठवले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज; मंत्र्यांचा रिमोट कंट्रोल अन्य ठिकाणी’
- एकनाथ शिंदेंनी धुडकावले राणेंचे ते वक्तव्य; म्हणाले…
- ‘सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था प्रचंड वाईट ; स्वाभिमान नावाचा अवयव काँग्रेसमध्ये राहिलाच नाही’
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- नार्वेकरांचा बंगला तोडला! सोमय्या म्हणाले, ‘करून दाखविले, आता पुढचा नंबर अनिल परबांचा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
