Share

सावधान! औरंगाबादेत खाटांपेक्षा जास्त रुग्णसंख्या

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज एक हजार ते बाराशे नवीन कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. उपलब्ध बेड्सच्या तुलनेत रुग्णसंख्या अधिक असल्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना बेडच मिळत नसल्यामुळे उपचारासाठीही विलंब होत आहे. गरिबांची आधार अशी ओळख असलेल्या घाटी रुग्णालयातही हीच अवस्था आहे. सक्रीय रुग्णांची एकूण ८५७० एवढी आहे तर उपलब्ध बेड्सची संख्या ६२२८ आहे. बेड्सच्या क्षमतेपेक्षा २३४२ अधिक रुग्णसंख्या असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.

वाढत्या रुग्ण संख्यमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करता करता आरोग्य यंत्रणेची दमछाक होऊ लागली आहे. एवढ्या रुग्णसंख्येवर उपचार करताना औषधी आणि मनुष्यबळ दोन्हीही अपुरे पडत आहेत. रुग्णसंख्येचा वाढता जोर ओसरला नाही तर ही परिस्थिती आणखीच बिकट होण्याची शक्यता आहे.

कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयातील अपुर्‍या बेड्सची संख्या यावर तोडगा म्हणून कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन म्हणजेच घरीच उपचार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. गुरूवारपर्यंत दीड हजारांवर रुग्णांना घरीच उपचार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांनी आता तरी बेफिकीरी आणि बेजबाबदारपणा सोडून स्वतःची काळजी घेणे, मास्क वापरणे, गर्दी टाळणे आणि वारंवार हात धुणे हाच सध्या तरी कोरोना महामारीपासून स्वतःचा बचाव करण्याचा सगळ्यात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!