🕒 1 min read
मुंबई: सौरव गांगुली आणि जय शाह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) लवकरच महत्त्वाची बैठक होणार आहे. सगळ्या क्रिकेटप्रेमींच्या नजरा या महत्त्वाच्या बैठकीकडे लागल्या आहेत कारण लवकरच भारतीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. सौरव गांगुलीचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपणार आहे. आणि या बैठकीत त्यासंबंधी निर्णय घेतला जाऊ शकतो.
विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली आणि जय शाह यांचा कार्यकाळ या वर्षी संपत असल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षाचीही निवड करावी लागेल. राजीव शुक्ला हे विद्यमान उपाध्यक्ष आणि जय शहा सचिव आहेत. जर कूलिंग कालावधी अडथळा बनला नाही, तर जय शाह आणि राजीव शुक्ला अध्यक्षपदासाठी सर्वात मोठे दावेदार असू शकतात. याशिवाय अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले जाऊ शकतात.
२ मार्च रोजी होणाऱ्या सर्वोच्च परिषदेच्या वर्चुअल बैठकीत कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सीके नायडू ट्रॉफी आणि महिला टी-२० स्पर्धेचा निर्णय घेतला जाईल आणि त्यासोबतच एकदिवसीय संघाची स्थानिक आयोजन समिती (LOC) २०२३ मध्ये आयोजन केले जाईल. २५ वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी सीके नायडू ट्रॉफी आणि महिलांची वरिष्ठ T20 स्पर्धा गेल्या महिन्यात देशात कोविड-१९ प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- “भाजप आणि ईडीचे अध्यक्ष एकच असतील किंवा…”; सुप्रिया सुळे यांची खोचक टीका
- निवृत्ती सामन्यासाठी सचिनने केली होती बीसीसीआयला ‘हि’ विशेष मागणी
- ‘मुंबई बॉम्ब स्फोटातील प्रमुख गुन्हेगाराची जमीन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विकत घेतली’ – राम कदम
- हरभजन सिंगचा खुलासा “धोनी क्रिकेटपेक्षा ‘या’ गोष्टीवर जास्त वेळ लक्ष देतो”
- “शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे…” ; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
