🕒 1 min read
मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे वारे वाहू लागले आहे. असे असतांनाच याविषयी आता काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाष्य केले आहे. तसेच कोण होतास तू, काय झालास तू? म्हणत बाळासाहेब थोरातांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की,‘राज ठाकरे हे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते असून मधल्या काळात त्यांची भाषण लोकप्रिय झाली ती ‘लाव रे तो व्हिडीओ’ या त्यांच्या फॉर्म्युल्यानंतर. परंतु दोनच वर्षांमध्ये त्यांनी एवढा मोठा युटर्न घेतला आहे की, आता त्यांची अवस्था पाहून, कोण होतास तू, काय झालास तू? असे म्हणावे लागेल.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘२०१९ लोकसभा निवडणूकीच्या काळात राज ठाकरेंच्या भाषणामुळे सामान्य जनांमध्ये त्यांच्याविषयी एक आकर्षण निर्माण झाले होते. सर्वत्र फक्त त्यांचीच चर्चा होती. परंतु त्यांनी घेतलेल्या युटर्नने आता सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे’, असे थोरात म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतील फोटो व्हायरल ; शिवसेना आणि मनसेत फेसबुक वॉर
- अखेरच्या क्षणापर्यंत भाजप ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करीत राहील- देवेंद्र फडणवीस
- IPL 2022 CSK vs PBKS : पंजाबविरुद्धच्या पराभवासाठी धोनी जबाबदार? सुनील गावसकरांनी काय म्हटलं ते वाचाच!
- “…हाच प्रश्न एकदा मनसुख हिरेनच्या पत्नीला विचारून बघा”, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना सल्ला
- “…तर शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे”, आदित्य ठाकरेंच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
